logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

सहर शेख यांचे आरोपांवर शायरी तून जोरदार प्रतिउत्तर

साजिद शेख शहापूर ठाणे जिल्हा प्रतिनिधी
“कोई भी आपको नीचे गिराने की कोशिश करे… अपनी काबिलियत इतनी बड़ी बनाइए…” या शब्दांत एमआयएम नगरसेविका सहर शेख यांनी गेल्या काही दिवसांपासून जात प्रमाणपत्र दाखल्यावरून होणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. आम्ही हिंदुस्तानी आहोत, आणि हा देश कुणाच्या बापाचा नाही, असे सांगत त्यांनी सोशल मीडियावरील ट्रोलिंग करणाऱ्यावर टीका केली.

ठाणे महापालिकेतील एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख आणि त्यांचे वडील युनूस शेख यांनी सोमवारी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन जात प्रमाणपत्राबाबतचे सर्व आरोप फेटाळून लावले. कोई भी आपको नीचे गिराने की कोशिश करे, तो एक बात हमेशा याद रखें, अपनी काबिलियत इतनी बड़ी बनाइए कि आपको हराने के लिए कोशिश नही साज़िश करनी पड़े, अशा शब्दात सहर शेख यांनी आरोप करणाऱ्याना प्रत्युत्तर दिले.

गेल्या चार दिवसांत मीडियाच्या माध्यमातून आमच्याविषयी खोट्या बातम्या पसरवण्यात आल्या. पण सत्य घराघरात पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे. जे लोक खोटे आरोप करत आहेत, त्यांना आम्ही अजिबात घाबरत नाही. कारण आम्ही सत्याच्या बाजूने आहोत आणि आमची कागदपत्रे खरी आहेत, असेही त्या म्हणाल्या.आमच्यावर अनेक आरोप झाले, परंतु त्या आरोपांना उत्तर कधी, केव्हा आणि कशा प्रकारे द्यायचे, हे आम्हीच ठरवणार होता. यामुळे आरोपांना उत्तर देण्यासाठी ही पत्रकार परिषद घेतली आहे. कोणीही आम्हाला बदमान करण्याचा प्रयत्न केला तरी आम्हाला काहीच फरक पडत नाही. कारण, प्रतिष्ठा देणारा देव असतो. खाली बसलेल्या कितीही लोकांनी बदनाम करण्याचा प्रयत्न केला, तरी देवच सर्व काही ठरवतो. आम्हाला बदनाम करू शकत नाहीत. कारण सत्य आणि न्याय शेवटी जिंकतात, असेही त्या म्हणाल्या.

मीडियाच्या बातम्यांचा सोशल मीडियावर मोठा प्रभाव पडतो. विशेषतः महिलांना अत्यंत वाईट पद्धतीने ट्रोल केले जाते. मी स्वतः अनुभवते की, मला अशा प्रकारचे अनेक अपमानास्पद संदेश येतात. जे लोक शिवीगाळ करतात किंवा चुकीच्या गोष्टी पसरवतात, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. अशा गोष्टींविरुद्ध कठोर पावले उचलणे अत्यावश्यक आहे. सोशल मिडियातील संदेशातून धर्माच्या नावावर भेदभाव निर्माण करणे चुकीचे आहे.

“हिंदू-मुस्लिम” अशा गोष्टी करून समाजात दरी निर्माण केली जाते, आणि हे थांबणे गरजेचे आहे. हिंदुस्तानी मुसलमानांना ‘पाकिस्तानला जा’ असे म्हणणे पूर्णपणे अयोग्य आहे. आम्ही हिंदुस्तानी आहोत, आणि हा देश कुणाच्या बापाचा नाही. जे लोक सतत पाकिस्तान, बांगलादेश, दहशतवादी बोलतात किंवा इतरांना तिकडे जाण्यास सांगतात, त्यांनी आधी स्वतःकडे पाहण्याची गरज आहे. कदाचित त्यांनाच त्या देशाची आठवण येत असेल, असेही त्या म्हणाल्या.जोपर्यंत माणूस बोलत नाही, तोपर्यंत त्याला कमजोर समजले जाते. पण प्रत्येक वेळी बोलणे आवश्यक नसते, कधी कधी शांत राहणे हीसुद्धा समजूतदारपणाची खूण असते. कारण चुकीच्या शब्दांमुळे दोन समाजात वाद निर्माण होऊ शकतात. म्हणूनच, स्वतःची काबिलियत वाढवा, स्वतःला सक्षम बनवा आणि आपल्या कामगिरीतून उत्तर द्या, असेही त्या म्हणाल्या.

सहर शेखचा जात दाखला खरा
आम्ही दाखला तयार करण्यासाठी दिलेल्या कागदपत्रात फेरफार केली असेल तर, त्याला बनावट दाखला म्हणता आले असते. पण, आम्ही तसे काहीच केलेले नसून सहर शेखचा दाखला हा खरा आहे, असा दावा करत सहरचे राजकीय करीयर संपविण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी नेत्यांकडून हे षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप सहरचे वडील युनूस शेख यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. तसेच एकाच सुनावणीत दाखला खोटा ठरविणारे ठाण्याचे तहसीलदार उमेश पाटील यांच्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदविल्याचेही त्यांनी स्पष्ट केले

18
991 views

Comment