
साखरखेर्डा च्या बालाजी अर्बन पतसंस्थेतील घोटाळा, मुख्य सूत्रधारास पुण्यात अटक
प्रतिनिधी जुबेर शाह
साखरखेर्डा: येथील बालाजी अर्बन शाखेत नकली सोने गहाण ठेवून पतसंस्थेची सुमारे ६ कोटीने फसवणूक केल्याचे काही महिन्यापूर्वी उघडकीस आले होते. यातील मुख्य सूत्रधारास पोलिसांनी पुणे येथून अटक केली आहे. इतर तीन आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.या प्रकरणातील फरार अजिंक्य शहाणे या मुख्य आरोपीस साखरखेर्डा पोलीसांनी पुण्यातून अटक केली आहे. बालाजी अर्बन को ऑप. क्रेडिट सोसायटी लि. चिखलीच्या साखरखेर्डा येथील शाखेत मागील वर्षी जुलै महिन्यात पतसंस्थेच्या सोने मूल्यांकक अजिंक्य दिलीप शहाणे याने शक्कल लावली. त्याचे कुटुंबीय व काही सहकार्याच्या नावाने पतसंस्थेत नकली सोने गहाण ठेवून कर्ज काढल्याची कुणकुण पत्रकार संतोष गाडेकर व अस्लम अंजुम यांना लागली. त्यावरून त्यांनी १६ जुलै २०२४ रोजी या गैरप्रकाराबाबत जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रार दाखल करून सखोल चौकशीची मागणी केली होती. त्या तक्रारीची दखल घेत जिल्हा उपनिबंधक यांनी त्याच दिवशी सहायक निबंधक देऊळगावराजा यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती.चौकशी अधिकारी जगदाळे यांनी पहीली सुनावणी ठेवली असता संस्थेच्या साखरखेर्डा शाखेतील सोने मुल्यांकक अजिंक्य दिलीप शहाणे यांना चौकशीसाठी बोलवले. त्यांने आपल्या कबुली जबाबात आपण स्थानिक शाखा सल्लागार राजू प्रभाकर केंधळे यांच्याशी संगनमत करून बनावट सोने असली दर्शवून स्वताच्या कुटुंबातील व मित्रपरीवातील व्यक्तींच्या नावाने सोने तारण कर्ज प्रकरणे केल्याचे कबुल केले.मात्र सहायक निबंधक एस. यु. जगदाळे यांनी सोने मूल्यांकक शहाणे यांच्या कबुली जबाबातील इतर कर्जदार राजू प्रभाकर केंधळे, भगवान सुभाष शहाणे, प्रदीप नामदेव अवचार तसेच गोपाल रंगनाथ पाझडे यांना वारंवार नोटीस देवूनही ते चौकशीसाठी हजर झाले नाही. शेवटी व्हिडिओग्राफर बाजीराव देशमुख, सोने फेरमूल्यांकक सचिन अनंत सराफ तसेच साक्षीदार दत्तात्रय देशमुख व ॲड. सचिन देशमुख यांच्या समक्ष सोने दागिन्यांची तपार केली. यावेळी तारण ठेवलेले सोने हे बनावट असल्याचे निदर्शनास आले. तसेच वजनातही तफावत असल्याचे निष्पन्न झाले.या प्रकरणी पतसंस्थेचे सरव्यवस्थापक अनिल गाडे यांनी साखरखेरड़ा पोलीस ठाण्यात सोने मूल्यांकक अजिंक्य दिलीप शहाणे, स्थानिक शाखा सल्लागार राजू प्रभाकर केंधळे, भगवान सुभाष शहाणे, प्रदीप नामदेव अवचार तसेच गोपाल रंगनाथ पाझडे यांनी संगनमत करुन बालाजी अर्बन पतसंस्थेला सुमारे ६ कसोटीने फसवले, अशी तक्रार १४ फेब्रुवारी २०२५ रोजी दिली होती. दरम्यान सदर प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर ठाणेदार गजानन करेवाड यांनी पाच जणांवर महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्था मधील हित संबंधाचे संरक्षण अधिनीयम १९९९ चे कलम ०३ अन्वये, गुन्हे दाखल केले होते.या पार्श्वभूमीवर पुण्यात दुय्यम ठाणेदार रविंद्र सानप, पोलीस जमादार विनायक परिहार यांनी अजिंक्य शहाणे यास अटक केली. तीन जण फरार असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल असे ठाणेदार गजानन करेवाड यांनी सांगितले.