logo

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व सहाय्य विभागाच्या वतीने विविध पुरस्कार वितरण सोहळा



वर्धा जिल्हा प्रतिनिधी:-

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा अंतर्गत सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दिनांक १० जून २०२५ रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सेंटर मध्ये विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. राज्यस्तरीय पुरस्कारामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषम पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राविण्य पुरस्कार असे दोन पुरस्कार वर्धा जिल्ह्यातील संस्थांना प्रदान करण्यात आले आहे. त्यापैकी माध्यम साक्षरता ग्रामीण विकास संस्था, बोपापुर (दिघी), तह. देवळी, जिल्हा वर्धा या संस्थेला सन २०२३-२०२४ या वर्षाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्री मा. संजय शिरसाट, रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री मा. भरत गोगावले, मृदा व जलसंधारण मंत्री मा. संजय राठोड, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे (भा.प्र.से.) यांच्या उपस्थितीत पार पडले होते. या पुरस्कार सोहळ्यामध्ये वर्धा जिल्ह्यातील माध्यम साक्षरता ग्रामीण विकास संस्थेला राज्याचे उपमुख्यमंत्री वा माजी मुख्यमंत्री एकनाथ खडसे यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विजय पचारे, संस्थेचे सचिव किरण पिपरे यांनी हा पुरस्कार स्वीकारलेला आहे. महाराष्ट्र राज्य शासनाकडून सन्मान चिन्ह, सन्मान पत्र, शॉल, श्रीफळ, रुपये १ लाख चा धनादेश आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच राज्यातील एकूण १३० संस्था आणि व्यक्ती यांची दोन दिवस राहण्याची व्यवस्था फाईव्ह स्टार हॉटेल ट्रायडेंट, नरिमन पॉईंट, मुंबई येथे करण्यात आली असून पुरस्कारार्थी यांच्या जाण्या येण्यासाठी शासकीय व्यवस्था करण्यात आली होती.
नागपूर विभागातून वर्धा जिल्ह्यातील माध्यम साक्षरता ग्रामीण विकास संस्थेची या पुरस्कारासाठी निवड झाल्याने संस्थेचे सदस्य आणि संस्थेच्या कार्यकर्त्यांमध्ये उल्हासाचे वातावरण पाहायला मिळत. त्याच बरोबर वर्धा जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाकडून सुद्धा सदर संस्थेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कर्ते यांना कार्यक्रम स्थळी नेणे आणि आणणे याची जबाबदारी उत्तम पणे समाज कल्याणचे अधिकारी व कर्मचारी सुरेश राऊत आणि मिनेश ढाक यांनी पार पाडली असल्याने महाराष्ट्र शासनाचे व वर्धा जिल्हा समाज कल्याण विभागाचे धन्यवाद संस्था प्रमुख विजय पचारे यांनी मानले आहे.

13
406 views