logo

बच्चुभाऊ कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनास पाठिंबा देत प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने राहुरी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन

राहुरी खुर्द प्रतिनिधी :- शिवाजी दवणे
प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू शेतकरी व दिव्यांगाच्या मागण्यासाठी ८ जून रोजी मोझरी जिल्हा अमरावती येथे उपोषणाला बसले आहेतआज सहावा दिवस आहे . अहिल्यानगर जिल्हा प्रहार दिव्यांग संघटना व राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने. राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील साहेब व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे साहेब प्रशासनाला निवेदन देऊन आमची आर्त हाक शासनापर्यंत पोहोचवावी या आशियाचा निवेदन देण्यात आले.गेंड्याच्या कातड्याचसरकारने कोणतीही दखल घेतली नाही. बच्चू कडू हे आपल्या 17 मागण्यावर ठाम आहेत. जर सरकारने मागण्या मान्य करून त्याची अंमलबजावणी केली नाही तर.आमच्या अंत यात्रेची तयारी करा. असे सरकारला सांगण्यात आले. 14 जून च्या अगोदर निर्णय घेतला नाही तर अहिल्यानगर येथील जिल्हा कार्यालयावर मोर्चा धरणे आंदोलन करण्यात येणार आहे तसेच काही दिव्यांग बांधव उपोषणासहित बसणार आहेत अशी माहिती जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे यांनी केली पूर्ण महाराष्ट्रभरात वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन सुरू होणार आहेत त्याच्या होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील.
बच्चू भाऊंच्या अन्नत्याग आंदोलनाच्या प्रमुख मागण्या खाली प्रमाणे:संजय गांधी पेन्शन मनपा दिव्यांग अनुदान(पेन्शन) 6000/- झालेच पाहिजे.,शासनाच्या निवडणुकीतील प्रचार अभिवचना प्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफी होऊ शकते, ती झालीच पाहिजे.
अन्य 17 मागण्या सरकारने मान्य केल्याच पाहीजेन अन्यथा महाराष्ट्रभर प्रहार स्टाईलने अंदोलन छेडन्यात येईल.
यावेळी उत्तर अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष मधुकर घाडगे जिल्हा सल्लागार सलीमभाई शेख, तालुका अध्यक्ष योगेश लबडे, तालुका सचिव दत्तात्रय खेमनर, सुरेश दानवे, नानासाहेब शिंदे, जुबेर शेख, जालिंदर भोसले, विजय म्हसे, बाबासाहेब मुसळे ,सतीश तरवडे, भरत आढाव, सचिन साळवे, सुरेश जगधने मेजर नानासाहेब खपके,चंद्रकांत रेबडे , विठ्ठल पांडे,जगन्नाथ हापसे,शिवाजी जाधव, प्रतीक धिमते,संदिप कुलकर्णी, योगेश पवार, बापू निमसे आदि उपस्थित होत.

187
3868 views