
*रिक्षात विसरले *
मी , सौ . संगीता वैभव कुलकर्णी आम्ही रविवार , दिनांक ८ जून २०२५ रोजी सायंकाळी ४ :३० वाजता साधना हाॅटेल कल्याण पश्चिम ते टिळकनगर डोबिंवली पुर्व रिक्षा प्रवासादरम्यान काळ्या कलरची बॅग रिक्षात विसरले !
सदर बॅग मध्ये
मोबाईल आधार कार्ड ,पॅनकार्ड , भ्रमणध्वनी कपडे इत्यादी वस्तु होत्या .
तसेच मला रिक्षा नंबर माहित नसल्याने आम्ही * रिक्षा चालक मालक असोसिएशन जनसंपर्क कार्यालय रेल्वे स्टेशन कल्याण पश्चिम * यांच्या कार्यालयात संपर्क साधून सविस्तर माहिती दिली . मा . श्री . जितेंद्र पवारांनी खूप सुंदर सहकार्य केले. त्याबद्दल मनापासून धन्यवाद .
समाजात प्रामाणिकपणाची कायम कमतरता असते असं म्हटलं जातं . मात्र याला काही अपवादही आहेत .
टिळक नगर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा .श्री . विजय कदम सर आणि मा . श्री . प्रशांत शिरसाट सरांनी सीसीटीव्ही फूटेज मधील दृश्य तपासून सरद रिक्षाचा MH - 05 BG 7368 नंबर काढला .
सदर नंबर आम्ही तो मा . श्री . श्रीराम पाटिल
सहायक पोलिस निरीक्षक श . वा . शा .डोंबिवली आणि मा . श्री . गांगुर्डे सर श . वा . शा . डोंबिवली यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी रिक्षा चालक श्री . हरीलाल जगन्नाथ सरोज यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की ती बॅग माझ्या कडे आहे .
ती बॅग आम्हाला परत मिळाली त्याबद्दल सर्व अधिकाऱ्याचे मनापासून खूप खूप धन्यवाद .
तसेच इतर वस्तू परत केल्याने पोलीस आणि रिक्षा चालकांचे सर्व ठिकाणी कौतुक होत आहे .