logo

पीएम श्री जिल्हा परिषद प्रशालेत प्रवेशोत्सवास माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची उपस्थिती. परतूर (प्रतिनिधी) भाऊसाहेब पाटील मुके -

बाल मनाला शिक्षणाची गोडी लागण्यासाठी प्रवेशोत्सव हा अतिशय महत्त्वाचा उपक्रम. आ. लोणीकरांचे प्रतिपादन.

पीएम श्री जिल्हा परिषद प्रशालेत प्रवेशोत्सवास माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची उपस्थिती
===================
प्रवेशोत्सवाच्या वेळी चिमुकल्यांची माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी गुलाब पुष्प देऊन शाळेमध्ये केले स्वागत
==================
आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितल्या त्यांच्या शाळेतील आठवणी
====================
परतूर (प्रतिनिधी)
भाऊसाहेब पाटील मुके -
आज सर्वत्र शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सव म्हणून साजरा केला जात आहे. विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे जंगी स्वागत शाळेमध्ये केले जात आहे. त्यामुळे निश्चितच बाल मनाला शिक्षणाची गोडी गोडी लागेल असे प्रतिपादन माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर यांनी केले.

ते परतुर येथील पीएम श्री जिल्हा परिषद प्रशालेमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या प्रवेशोत्सव कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, विद्यार्थ्यांची मानसिकता तयार करण्यासाठी निश्चितच या उपक्रमाचा मोठा फायदा होणार असून या माध्यमातून चिमुकल्यांना शाळेची ओढ लागावी, शाळेविषयी प्रेम निर्माण व्हावे व त्या माध्यमातून त्यांना शिक्षणाची गोडी लागावी हा उद्देश असून आपण लहान असताना अशा प्रकारची उत्सव वगैरे नव्हते मात्र त्यावेळच्या आठवणी अजूनही माझ्या मनात जागृत असून मी वर्गातला फार हुशार विद्यार्थी जरी नव्हतो तरी ग्रामीण भागातील शाळेमध्ये शिकत असताना अतिशय खोडकर असा विद्यार्थी होतो. त्यामुळे खऱ्या अर्थाने मला शिक्षण घेता आले नाही याची खंत असून, राजकारणाच्या माध्यमातून मी मंत्री पदापर्यंत पोहोचलो. मात्र शैक्षणिक बाबतीत मला फारसे काही करता आली नाही. त्याची खंत अजूनही माझ्या मनात असल्याचे सांगतानाच, पालकांनी आपल्या पाल्याकडे बारकाईने लक्ष देऊन त्याच्यात असलेले गुण फिरूनच त्यांना त्या त्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेण्यासाठी उत्तेजन द्यावी असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

पुढे ते म्हणाले की, शिक्षण हे वाघिणीचे दूध असून जो पीला तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले असून शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तिगत विकासाची जबाबदारी निश्चितपणाने पूर्ण होतात. त्याच माध्यमातून देशाची सेवा करण्याची संधी मिळत असते, असेही यावेळी त्यांनी सांगितले.

यावेळी कार्यक्रमाला माजी आ. विलास बापू खरात, गट विकास अधिकारी राजेश तांगडे, गटशिक्षणाधिकारी अशोक सोळंके, मु. अ. गणेश राठोड, द. या. महाराज काटे, भगवानराव मोरे आदिसह पालक वर्ग, शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

49
2584 views