
माळशिरस तालुक्यात घरकुल योजनेत घोटाळा ; अनेक कुटुंबाला दोनदा लाभ- खरे गरजू लाभार्थी वंचित
माळशिरस तालुक्यात घरकुल योजनेत घोटाळा ; अनेक कुटुंबाला दोनदा लाभ- खरे गरजू लाभार्थी वंचित
माळशिरस - सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील नेवरे गावात घरकुल योजनेत मोठ्या प्रमाणावर फसवणुकीचे प्रकार समोर आले आहेत. अनेक कुटुंबाला घरातली अन्य सदस्याच्या नावाने दोनदा घरकुल योजनेचा लाभ देण्यात आल्याचे माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीतून निष्पन्न होत आहे. या अशा प्रकारामुळे खऱ्या गरजू लोकांना योजना लाभत मिळत नाहीत, अशी तक्रारवाचा चर्चा गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
घरकुल योजना गरजू लोकांना त्यांच्या स्वप्नातील घर मिळवून देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने राबवलेली महत्वाकांक्षी योजना आहे. यामध्ये पंतप्रधान आवास योजना, इंदिरा आवास योजना, रमाई आवास योजना यांचा समावेश आहे. मात्र नेवरे गावात या योजनेचा गैरवापर होत असल्याचे समोर आले आहे. काही कुटुंबांना नियम मोडून दोनदा घरकुल लाभ देण्यात आला आहे, तर काही जण घरकुल मिळवण्यासाठी चुकीच्या माहितीचा वापर करत असल्याचेही दिसून येत आहे.
घरकुल योजनेत प्रत्येक कुटुंबाला फक्त एकच घर देणे हा नियम आहे.अन्य घरकूल योजनेत लाभ घेतला असेल तर अशा लोकांना परत वेगळ्या घरकूल योजनेत लाभ घेता येणार नाही असे नियमध्ये नमूद असुन पण गैरमर्गाचा वापर केला गेला आहे, यासाठी रेशनकार्ड, जमीन ७/१२ उतारा, कुटुंबातील इतर सदस्यांची यादी, बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी अशा निकषांची तपासणी करूनच लाभ मंजूर केला जातो. मात्र नेवरे ग्रामपंचायतीकडून हे नियम कणखरपणे पाळले जात नाहीत. सरकारी नोकरीत असणाऱ्या, पेन्शनधारक, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य व शिपाई यांना प्राथमिकता देत नियम मोडले गेले आहेत व अजूनही नियम पाळले जात नाहीत असा लोकांचा आरोप आहे. काही लाभार्थ्यांनी घरकुल योजनेचा लाभ घेतल्यानंतर बांधकाम पुर्ण न करता आर्थिक मदत मिळवली आहे. तसेच काही जण घरकुलासाठी इतर लोकांच्या कच्च्या घरांची बांधकाम नावे दाखवून लाभ मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. ह्या सर्व घटना गावकऱ्यांतून जोरदार चर्चिला जात आहेत.
नेवरे गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत तसेच पंचायत समितीकडे अनेक तक्रारी केल्या,पण त्यांच्याकडून कोणतीही कारवाई केली जात नाही उलट अधिकारी वर्गाकडून तक्रार करणाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो वेगवेगळया प्रकारे नाहक त्रास ही दिला जातो , यामुळे लोक तक्रार करण्यास घाबरतात. त्यामुळे पंचायत समिती व ग्रामपंचायत अधिकारी संगनमताने आर्थिक भ्रष्टाचार करत आहेत आणि यामध्ये वाढतच होत असून खऱ्या गरजू लोकांचा सरकारने ठरवलेला गरीब परिस्थिती असलेल्या लोकांचा फायदा शासकिय यंत्रणेकडून दडपला जात आहे. व अशा कुटुंबाला घरकूल योजनेपासून वंचित ठेवले जात आहे.
या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये संताप आहे. नियम मोडणाऱ्या ग्रामपंचायतीविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. ग्रामपंचायतीवर योग्य तपासणी अधिकरिकडून चौकशी अहवाल सादर करून दोषींवर कठोर कार्यवाही होणे गरजेचे आहे.