logo

राष्ट्रीय समाज पक्षाचा साताऱ्यात मोर्चा

सविस्तर..
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा. शासकीय कंत्राटी नोकर भरती बंद करावी. यासह इतर अन्य मागण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आक्रमक असल्याचे दिसले.
जिल्ह्यातील सेतू कार्यालयात दाखल्यासाठी होत असलेला भ्रष्टाचार थांबवावा. विद्यार्थ्यांचे ऑनलाइन दाखले लवकर मिळावेत. शासकीय रुग्णालयात चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळाव्यात, सर्वांना समान शिक्षण मिळावे, काही अधिकारी कागदी घोडे नाचवून शासकीय योजनाच्या लाभापासून इच्छुकांना वंचित ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. यासह अन्य मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय ते पोवई नाका त्यानंतर नगरपालिका, पोलिस ठाणे, व पुन्हा पोवई नाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे लोकसभा अध्यक्ष उमेश चव्हाण, जिल्हाध्यक्ष डॉ. रमाकांत साठे, खंडेराव सरक, भाऊसाहेब वाघ, विमल शिंदे, किरण माने, रघुनाथ सकट, संदीप पवार, मंगेश चव्हाण यांच्यासह इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

15
1217 views