logo

वर्धा जिल्ह्यातील देवळी येथील राम मंदिर मध्ये अखिल भारतीय भोई समाज सेवा संघाच्या वतीने मेळावा घेण्यात आला.

आज देवळी येथील श्रीराम मंदिर येथे अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था चे वतीने भव्य समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्याला गजानन साठोटे, तुकाराम वानखेडे, देवळी येथील समाजसेवक सर्वांचे परिचित किरण परीसे, रवींद्र भनारकर, रवींद्र पारीसे, विजय पचारे, तसेच अनेक भोई समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, देवळी पुलगाव विधानसभेचे नवनियुक्त आमदार राजेश बकाने तसेच मोठ्या संख्येने भोई समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली मान्यवरांचे स्वागत करण्यात आले नंतर राजेश बकाने यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी व पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय पचारे यांनी केले व राजेश बकाने यांनी अध्यक्षीय भाषण करावे असे त्यांना विनंती केली. आमदार राजेश बकाने यांनी आपल्या भाषणात भोई समाजाच्या अनेक अडचणी व हक्क यावर प्रकाश टाकला. अशातच त्यांच्याकडे देवळी येथील समाज बांधवांकडे समाज भवन नसल्यामुळे समाज भवनाच्या मागणीचे चे निवेदन देण्यात आले त्यावर बोलताना राजेश बकाने म्हणाले की, मी अवघ्या सहा महिन्या अगोदर निवडून आलेले आहे परंतु अद्यापही माझ्याकडे भोई समाज बांधवांच्या वतीने समाज भवनासाठी निवेदन आलेले नव्हते पण आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझ्याकडे हे निवेदन आलेले आहेत तर येत्या एक ते दीड वर्षांमध्ये देवळी येथे समाज भवन चे बांधकाम पूर्ण होईल. व ते पुढील कार्यक्रमास निघून गेले.नंतर समाजसेवक किरण पारीसे यांच्या भाषणाची सुरुवात झाली ते म्हणाले की कोण काय आहेत हे सर्वांना माहित आहे त्यामुळे मी सरळ मुद्द्याच बोलतो आपली संत भीमा भोई उत्सव समिती आहे त्या समितीच्या वतीने भोई समाज भवनाच्या बांधकामाचे काम अंतिम टप्प्यात आहे. आपणास कोणीही आमदार किंवा खासदाराचे आवश्यकता नाही गेल्या पंधरा वीस वर्षापासून आमदार खासदार आपल्याला फक्त चॉकलेटच देत आलेले आहेत. कोणीही आमदार किंवा खासदार आपल्याला काहीही देणार नाही. पण ज्या जागेवर त्यांनी बांधकाम सुरू केले त्या जागेचे वर्णन मात्र केले नाही. कदाचित त्यांची एक शिक्षण संस्थेची जागा आहे त्यावर त्यांनी बांधकाम सुरू केलेले असावे पण जर असे असेल तर ती शिक्षण संस्था त्यांच्या नावावर आहे म्हणजे त्याचे ओनर ते आहेत. मग एखाद्याचे प्रायव्हेट प्रॉपर्टी समाज भवन म्हणून तो व्यक्ती किती दिवस वापरण्यास देणार आहे? असे अनेक प्रश्न व्हाट्सअप च्या माध्यमातून त्यांना विचारले असता एक अक्षर बोलायला तयार नाही एक तर स्थानिक नेत्यांकडून अजूनही समाजाचा उद्धार झालेला नाही आणि बाहेरील नेते जर संघटन तयार करून या विधानसभा क्षेत्रातील भोई समाजाचे अनेक प्रश्न शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न करत असतील तर एखादा समाजसेवक याला आडकाठी येतो की काय असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे. स्थानिक नेत्यांना समाजाचे संघटन नको आहे का? मी काय केले मी स्वतःच काहीही करू शकतो अन्यथा कोणीही नाही असे व्यक्तव्य एखाद्या नेता का करतो असा संतप्त प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे. असा जर मी पणा मीरवणारा कोणी स्थानिक नेता असेल तर त्या ठिकाणी समाजाचे संघटन होऊ शकते का असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.

54
1904 views