logo

BSNL ची सेवा ठरतेय ग्राहकांची डोकेदुखी:अन् कर्मचारी नॉट रिचेबल*

कन्हैया क्षीरसागर
देवरी.फुक्किमेटा
ग्राम फुक्किमेटा येथील बीएसएनएल सेवा ठप्प पडली असून मोबाईलमध्ये टॉवर राहत नाही. त्यामुळे छत्तीसगड सीमेवर बसलेल्या नक्षलग्रस्त ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि व्यापारी हैराण झाले आहेत. बीएसएनएलने त्वरित सेवा दुरुस्त करावी अन्यथा रस्त्यावर उतरुन आंदोलन केले जाईल असा इशारा, शेतकरी, शेतमजूर तथा व्यापार्यांना दिला आहे.
BSNL (भारत संचार निगम लिमिटेड) ही सरकारी दूरसंचार कंपनी आहे, जी पूर्वी चांगली सेवा देत होती, पण आता तिच्या सेवांमध्ये अनेक समस्या येत आहेत. यामुळे ग्राहक खूप त्रस्त झाले आहेत. अनेक ठिकाणी BSNL चे टॉवर व्यवस्थित काम करत नाहीत, ज्यामुळे नेटवर्कची समस्या येते. यामुळे लोकांना कॉल करणे, इंटरनेट वापरणे आणि इतर सेवा वापरण्यात अडचणी येत आहेत.
अनेक ठिकाणी BSNL चे टॉवर बंद पडले आहेत किंवा त्यांची रेंज कमी झाली आहे. यामुळे खेड्यापाड्यातील लोकांना जास्त त्रास होत आहे. लोकांना त्यांचे महत्वाचे कामे करतांना अडचणी येत आहेत. BSNL च्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधणेही कठीण झाले आहे.
ग्राहक वारंवार तक्रारी करूनही, BSNL कडून यावर काही ठोस उपाययोजना केली जात नाहीये, असे लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे BSNL च्या या समस्येमुळे ग्राहक खूप नाराज झाले आहेत आणि त्यांची डोकेदुखी वाढली आहे.
वास्तविक पाहता 2ते3 महिन्यापासून हा प्रकार असला तरहीही ही यंत्रणा करतेय काय ? असा सवाल ग्राहक करीत आहेतबीएसएनएल ही शासन अंगीकृत व सर्वाधिक विश्वासार्ह सेवा मानली जाते. मात्र दिवसेंदिवस ही सेवा खरोखरच ग्राहकांची डोकेदुखी बनत चालली आहे.
आता चक्क सकाळपासून सायंकाळपर्यंत सेवाच बंद राहत असल्याने ग्राहक वैतागले आहेत. अन् कर्मचारी नेहमीच नॉट रिचेबल राहत असल्याचे चित्र आहे.
Bsnl ने बीएसएनएलने त्वरित सेवा दुरुस्त करावी अन्यथा रस्त्यावर उतरुन आंदोलन केले जाईल असा इशारा, शेतकरी, शेतमजूर तथा व्यापाऱ्यांनी दिला आहे.

34
3152 views