logo

नायगांव येथे भाजपाच्या वतीने जनता दरबार संपन्न

(जिल्हा प्रतिनिधी :- विकास वाघ धाराशिव) कळंब तालुक्यातील नायगाव येथे नुकताच विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोकराव शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ साळुंखे तसेच रामहरी शिंदे संजय बोंदर, संजय घोगरे,छाया बोंदर,किरण पाटील, उमाकांत गिराम, मतीन पटेल, फिरोज पठाण, बाळासाहेब सरवदे. नंदकुमार समुद्रे.लक्ष्मण देशमुख,किरण एडके,बालु आबा एडके, प्रल्हाद गिराम, बाळासाहेब राऊत,बद्रीनाथ धप्पाधुळे, आदी प्रमुख नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी विठ्ठल रखुमाईचे पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.येथे उपस्थित जिल्हा परिषद सर्कल मधील सर्व नागरिकांनी या जनता दरबार मध्ये आपल्या अनेक समस्या प्रमुख पाहुण्या समोर लेखी निवेदनाद्वारे दिल्या. यावेळी भाजपा सरकारचे यशस्वी ११ वर्षातील धोरण व योजनेची माहिती देऊन नागरिकांच्या सर्व समस्या जाणून घेऊन त्या आपण लवकरात लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न करु असे बोलताना भाजपा तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ साळुंखे यांनी सांगितले. हा जनता दरबार सर्कल मधील अनेक अडचणी सोडविण्यासाठी असल्याने बरेच प्रश्न लवकरच मार्गी लागणार अशी आशा येथिल उपस्थित नागरिकांमध्ये दिसून येत होती. यावेळी उद्धवराव पाटील,माजी संचालक भरत पाटील, प्रल्हाद शितोळे, व्यंकट शितोळे, अनिल गोरे, विकास वाघ (कुलकर्णी) अभिजीत पाटील, हनुमंत लामतुरे,तसेच नायगांव जिल्हा परिषद सर्कल येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

26
1261 views