logo

जळगाव–छत्रपती संभाजीनगर प्रवासाला नवे गतीशील वळण!

जळगाव–छत्रपती संभाजीनगर प्रवासाला नवे गतीशील वळण..
पाचोरा प्रतिनिधी जिल्हाध्यक्ष (Aima Media):-
नागपूर येथे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मा. नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत जळगाव ते छत्रपती संभाजीनगरचा प्रवास अवघ्या १ तासात पूर्ण होईल, असा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.

औट्रम घाटातील बोगदा (टनल) आणि व्हायाडक्ट या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात १२.७५ किमी लांबीच्या रस्त्याच्या बोगद्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी अंदाजे २६०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून रखडलेला औट्रम घाटातील प्रकल्प मार्गी लागणार असून, चाळीसगाव, खान्देश आणि मराठवाडा यांच्यासाठी हा एक क्रांतिकारी टप्पा ठरणार आहे. या प्रकल्पामुळे ना केवळ अंतर कमी होईल, तर वाहतूक सुरळीत होऊन आर्थिक आणि सामाजिक विकासालाही चालना मिळेल.

या बैठकीला मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी,खासदार स्मिता ताई वाघ. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मा. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, आमदार सौ. देवयानी फरांदे, आ. मंगेश चव्हाण यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


2
309 views