logo

चिखली तालुक्यातील ग्राम धोत्रा भंनगोजी येथे.तरुण शेतकऱ्याची गळफास घेवून आत्महत्या!!


चिखली (AIMA MEDIA MANSUR SHAHA) : प्राप्त माहितीनुसार धोत्रा भंन गोजी येथील एका ३८ वर्षीय तरुण शेतकऱ्याने गळफास
घेवून आत्महत्या केल्याची घटना आज रविवार २२ जून रोजी दुपारी सोडचार वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मृतक शेतकऱ्याचे नाव विजय रुस्तुमरावराजे जाधव असे आहे.
येथील रहिवासी असलेले विजय जाधव (वय ३८) व त्यांचा भाऊ सतिश यांच्यानावे अडीच एकर शेती आहे. क्रॉपलोन मिळण्यासाठी ते बँकाकडे मागील महिन्याभरापासून चकरा मारत होते. मात्र बँकेकडून तांत्रिक अडचणी असल्याने त्यांचे कर्ज मंजूर झाले नव्हते. मागीलवर्षी देखील त्यांना पीककर्ज देण्यात आले नव्हते. यावर्षी सोयाबीनची पेरणी केली, मात्र सोयाबीन उगवलेच नाही. दुबार पेरणी कशी करावी? त्यात सोयरीकही जमत नसल्याने नैराश्यमयझालेल्या विजय जाधव यांनी आज २२ जून रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास गायीच्या गोठ्यामध्ये गळफास घेवून आत्महत्या केल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. विजय हा घरातील कर्ता पुरुष असल्याने कुटुंबीयांवर दुखाःचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई, बहिण, लहानभाऊ, भावजई, पुतणे असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

47
3577 views