logo

मनसे आणि परिवर्तन फेरीवाला वेलफेअर असोसिएशनतर्फे शाळकरी मुलांना ५०० छत्र्यांचे वाटप

नवी मुंबईत सामाजिक बांधिलकीचे दर्शन
नवी मुंबई, २४ जून २०२५: पावसाळा सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये या उद्देशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि परिवर्तन फेरीवाला वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने महापे, नवी मुंबई येथे एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना तब्बल ५०० छत्र्यांचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
या प्रसंगी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. यामध्ये मनसेचे नवी मुंबई उपशहर अध्यक्ष श्री. विनोद पार्टे साहेब, कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री. विनोद पाखरे, आणि कामगार सेनेचे उप चिटणीस श्री. गणेश पाटील हे प्रामुख्याने उपस्थित होते.
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन मनसे महापे, नवी मुंबईचे शाखा अध्यक्ष आणि परिवर्तन फेरीवाला वेलफेअर असोसिएशनचे उपशहर अध्यक्ष श्री. सचिन कर्नाळे यांनी केले होते. त्यांच्या पुढाकारानेच हे छत्री वाटप यशस्वीरित्या पार पडले. यावेळी त्यांच्यासोबत समी गुप्ता, नमी गुप्ता, विक्रम ठाकूर, विकास काकडे आणि श्री हनुमंत वाघमारे हे देखील उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पावसाळ्यात शाळेत ये-जा करताना मोठा दिलासा मिळेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. मनसे आणि परिवर्तन फेरीवाला वेलफेअर असोसिएशनने केलेल्या या कार्याचे सर्वच स्तरांतून कौतुक होत असून, हे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
बातमी देण्यासाठी संपर्क:
दत्तात्रय तुकाराम काळे (सामाजिक मीडिया कार्यकर्ता, एआयएमए मीडिया फाउंडेशन प्रतिनिधी)
मोबाईल: ८०८००७६२६२

19
5731 views