
*सौर ऊर्जा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मीती*: *प्रधानमंत्री नरेंद्र मोदी*
*सौर ऊर्जा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मीती*: *प्रधानमंत्री नरेंद्र मोदी*
*प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यातील २४५८ मेगावॅट क्षमतेचे ४५४ सौर ऊर्जा प्रकल्पांचे लोकार्पण*
*प्रधानमंत्री यांनी सौर ऊर्जा प्रकल्पातील लाभार्थ्यांशी साधला संवाद*
मुंबई,दि.२५ : सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे शेतीला दिवसा वीज उपलब्ध होत आहे ज्यामुळे शेतक-यांचे आर्थिक उत्पन्न दुप्पट होत आहे. मात्र शेतक-यांनी नैसर्गिक शेतीवर भर देवून कमी खर्चात जास्त उत्पन्नावर आधारित पीक पध्दतीचा वापर करावा. शेतीचे आरोग्य संवर्धन उपाय होणे काळाची गरज आहे.. या सौर ऊर्जा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मीती होत असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले. दूरदृश्य प्रणाली द्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यातील २४५८ मेगावॅट क्षमतेचे ४५४ सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते.
राजस्थान बौसंवाडा येथे ऊर्जा तसेच विविध विकास योजनांचा लोकार्पण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण बांद्रा पूर्व प्रकाशगड येथून करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक वर राधाकृष्णन बी, राज्यातील पी एम कुसुम सी - मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 आणि पी एम कुसुम सी बी - मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचे लाभार्थी शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पातील विविध लाभार्थ्यांशी संवाद साधला. दूरदृश्य प्रणाली द्वारे राज्यातील २४५८ मेगावॅट क्षमतेचे ४५४ सौर ऊर्जा प्रकल्पाचे प्रधानमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण पार पडले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की, सौर ऊर्जा प्रकल्पाचे खूप फायदे आहेत. शेतक-यांना शेतीला दिवसा वीज उपलब्ध होते आहे त्याच बरोबर बारमाही पाण्याची व्यवस्था झाली आहे. यामुळे शेतक-यांचे उत्पन्न वाढले आहे. आता शेतक-यांनी केमिकल मुक्त शेती करण्यासाठी भर दिला पाहिजे. झिरो कॉस्ट फार्मिंग ला देखील महत्त्व दिले पाहिजे. . झिरो बजेट नैसर्गिक शेती ही अशी शेती पद्धत आहे, ज्यामध्ये रासायनिक खते, कीटकनाशके यांचा वापर कमी करून खर्च कमी केला जातो, ज्यामुळे शेतकऱ्यांचे शेतीमध्ये आर्थिक गुंतवणूक वाचते आणि जमिनीचे आरोग्य सुधारते. त्याचबरोबर पारंपारिक शेती ऐवजी काळानुरूप बदलती शेती करणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की,भारताला आज रोजी एक लाख करोड खाद्यतेलाच्या आयात करावी लागते. ही समस्या सोडवण्यासाठी शेतकऱ्यांनी खाद्यतेल बियांची लागवड करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मिलेटची देखील सध्या खूप मागणी आहे हे लक्षात घेता त्या प्रकारच्या पद्धतीची पिके घेतली तर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून शेतकऱ्यांनाआर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल होईल.राज्याचे राज्यपाल आर्चाय देवव्रत यांची नैसर्गिक शेतीवरील व्याख्यांनाचे शेतक-यांनी जरूर ऐकावे असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सौर उर्जा प्रकल्पातील विविध लाभार्थ्यी शेतक-यांचा परिचय करून दिला.
*प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सौर ऊर्जा प्रकल्प लाभार्थ्यांशी संवाद साधत जाणून घेतल्या प्रकल्पाच्या यशोगाथा*
*सौर ऊर्जा प्रकल्पामुळे शेतक-यांचे वाढले उत्पन्न*
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतक-यांना प्रकल्पाची यशोगाथा प्रत्यक्ष लाभार्थ्यांशी संवाद साधून जाणून घेतल्या.किकवारी,तालुका सटाणा जिल्हा नाशिक येथील शेतकरी सुनील सिताराम काकुलते यांनी पीएम कुसुम सी - मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत ४० एकर जमीन सिंचनाखाली आणली असून यामुळे दरवर्षी दोन लाख रुपये इन्कम वाढलेला आहे.५० ते ६० लोकांना यामुळे रोजगार प्राप्त झाला असल्याचे सांगितले.
भेंडी महळ तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला येथील शेतकरी तुषार वानखेडे यांनी १० मेगावॉट पी एम कुसुम सी - मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना मध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाची योजना ६.५ एकरं मध्ये राबवली.यापूर्वी रात्री वीज नसल्यामुळे अडचणी निमार्ण होत होत्या. शेतीला पाणी कमी पडत असल्यामुळे हरभरा सारखी पीक घेतली जात होती. आता पपई आणि केळीच पीक घेऊन ३५ हजार ऐवजी ८० हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे त्यांनी सांगितले.
सतेफाड तालुका जाफराबाद जिल्हा जालना मधील सुरत जटाळे यांनी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेतून पाच एच पीचा पंप बसवला असल्याचे सांगून या योजनेमुळे त्यांच्या शेतीच्या उत्पन्नात भरघोस वाढ झाली असेल पंप बसवल्यापासून त्यांचा वार्षिक उत्पन्न साठ हजार रुपयांवरून दीड लाख रुपये पर्यंत गेले आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. शेतीमध्ये घरातीलच तीन व्यक्ती काम करत असून मुलाच्या शिक्षणासाठी आणि पुन्हा शेतीमध्ये उत्पन्न घेण्यासाठी आलेल्या नफ्याचा उपयोग करत असल्याचे त्यांनी सांगितले.
बापकाळ तालुका जिल्हा जालना येथील शेतकरी ताई किशोर सावंत म्हणाल्या की, पीएम कुसुम बी - मागील त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये २ एकर क्षेत्रात तीन एच. पी. चा सोलर पंप बसवला आहे.यामुळे सोयाबीन पिकाच्या उत्पादन वाढ झाली आहे. त्याचबरोबर उरलेल्या इन्वर्टर मध्ये च्या माध्यमातून घरात विज वापर केला जातो असेही त्यांनी सांगितले.
माई वस्ती पेठ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथील माधुरी धुमाळ यांनी पीएम कुसुम सी - मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.0 या योजनेत दहा मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प 10 एकर मध्ये उभारला आहे.या परिसरातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वार्षिक पंधरा लाख उत्पन्न या प्रकल्पातून मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
वाकवड तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथील चंदू पावरा या शेतकऱ्यांनी पीएम कुसुम बी- मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये 7.5 एचपी क्षमतेचा सौर कृषी पंप बसवला असून त्यामुळे दिवसा वीज उपलब्ध होऊन पाण्याच्या उपलब्धतेमुळे मका गहू भुईमूग या पिकांची पेरणी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यातील गोपाळ महल्ले यांनी पीएम कुसुम सी- मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 या योजनेत लाभ घेतला आहे. या सर्व प्रकल्पामुळे ग्रामपंचायतीला दरवर्षी पाच लाख रुपये मिळत असून या शेतकऱ्यांनी सतराशे लोकांना वीज पुरवठा केल्यामुळे शेतकऱ्यांची विजेची समस्या मिटली असून या भागामध्ये शेतकरी दिवसा दिवसा वीज उपलब्ध होत असल्यामुळे आनंदी असल्याचे सांगितले.
*पीएम कुसुम सी-मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 व पीएम कुसुम बी-मागेल त्याला सौर कृषी पंप योजना*
पीएम कुसुम सी-मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 या योजनेत ६ लाख शेतक-यांना दिवसा वीज पुरवठा होत आहे.३२.०८ लाख एकर जमीन ओलिताखाली आली आहे. सह इतर विविध योजनेतून राज्यात आतापर्यंत ६ लाख ४६ ६९४ सौर कृषी पंप बसविण्यात आले असून राज्याने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे.या योजनेमुळे २०.९५ लाख एकर जमीन ओलिताखाली आली आहे.
*******