कोंढाणा ते धाबा पक्का रस्ता बनणार का? फक्त आश्वासनच.
कोंढाणा ते धाबा रस्त्याची अवस्था मागील 5 वर्षांपासून बिघडत चालली आहे. अनेकदा कोंढाणा वासीय तहसीलदार, sdm कार्यालयाला, आमदार ला निवेदन देऊन सुद्धा. फक्त शब्द च एकायला मिळत आहे.. कि रस्ता बनणार.. पण केव्हा असा प्रश्नचिन्ह कोंढाणा वासियत निर्माण होत आहे. शाळकरी मुलांना, एमर्जन्सी हॉस्पिटल ला जाताना पावसाळ्यात नाहक त्रास सहन करावा लागतो. अनेकदा शासनाकडे मागणी करून सुद्धा शासन दुर्लक्ष करीत असल्याचे चिन्ह दिसत आहे.. खरोखर कोंढाणा वासियांवर अन्याय होत आहे अशी दाखल राष्ट्रीय मानवाधिकार न्याय आयोगाचे जिल्हाध्यक्ष अमित अलोणे यांनी घेतली आहे. आमदार कडे गेले असता निधी मंजूर झाला आहे असे कळले परंतु अजूनपर्यंत काही थांग पत्ता लागत नाही.. परत एकदा कोंढना वासीय ठिय्या आंदोलनाच्या तयारीत राहणार.
त्यामुळे शासनाने तातळीने पक्का रस्ता बनण्याकडे लक्ष द्यावे. अशी मागणी रा. मा. न्याय आयोग जिल्हाध्यक्ष यांनी केली आहे.