विश्वासराव रामराव चोपडे यांचे निधन
अमरावती जिल्हा: अमरावती जिल्ह्यातील तुरखेड येथील ज्येष्ठ समाजसेवक विश्वासराव रामराव चोपडे यांचे २२ मे २०२६ रोजी वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने सामाजिक, शैक्षणिक आणि ग्रामीण विकास क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
विश्वासराव चोपडे यांनी अत्यंत सामान्य परिस्थितीतून जीवनाची सुरुवात केली. समाजसेवेची ओढ, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठा यांच्या बळावर त्यांनी समाजात वेगळे स्थान निर्माण केले. गरीब विद्यार्थ्यांना मदत, युवकांना मार्गदर्शन तसेच ग्रामीण विकासासाठी अनेक उपक्रम राबविण्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता. त्यांच्या कार्याची दखल अनेक सामाजिक संस्थांनी घेतली होती. त्यांचे जेष्ठ चिरंजीव माजी प्राचार्य गजाननराव चोपडे यांनी अकोला व अमरावती या दोन्ही जिल्हात वडिलांचा वारसा पुढे नेत अंजनगाव येथेच स्वामी विवेकानंद शाळेची स्थापना करून परिसरातील गरजू व गरीब विध्यार्थी साठी एक शैक्षणिक दालन उपलब्ध करून दिले आहें. स्वतः अविवाहित राहून विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांना त्यांनी मदत व मार्गदर्शन केले आहें. लहाने चिरंजीव अमेरिकेसारख्या देशात राहून सुद्धा आपल्या मातीशी असणारे नाते विसरले नाहीत. अंत्यन्त साधी सुधी राहणी वउच्च विचार तथा विवेकानंद यांच्या विचाराचा प्रभाव त्यांच्यात दिसून येतो. 🙏
त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक व असंख्य हितचिंतक असा परिवार आहे. त्यांच्यावर दिनांक २३ मे २०२६ रोजी दुपारी ५ वाजता अंजनगाव सुर्जी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.